भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ८८व्या धर्मान्तर घोषणा वर्धापन दिना निमित्त येणार्या बौद्ध बांधवांना दुध वाटप…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी १९३५ साली डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सभा घेतली होती.या सभेत डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मातराची घोषणा केली. या एतिहासिक घोषणाला ८८ वर्षे पूर्ण झाली आहे.दरवर्षी या ठिकाणी राज्य भरातुन भिम अनुयायी मोठ्या संख्येने या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात.

या निमित्ताने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्च्या च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 88 व्या धर्मान्तर घोषणा वर्धापन दिना निमित्त येणार्या बौद्ध बांधवांना दुध वाटप करण्यात आले आहे.संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे  तसेच कोपरगावच्या प्रथम महिला आमदार  स्नेहलताताई  कोल्हे व युवानेते विवेकभैय्या  कोल्हे यांच्या मार्ग दर्शनाखाली  १३ आँक्टोबर २०२३ रोजी टाकली फाटा  या ठिकाणी मसाले दुध वाटप करण्यात आले यावेळी   अमृत संजीवनीचे चेअरमन  पराग संधान , डी.आर काले, ‘अं.जा जमाती मोर्चा चे शहर अधक्ष शंकर बिर्हाडे ‘ अनिल जाधव’ सतीश राणोडे’ गोरख देवडे’सोमनाथ ताकवाले ‘संजय खरोटे यांच्यासह सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *