
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव कोपरगावसह संपूर्ण महाराष्ट्रावर आलेले दुष्काळाचे सावट दूर व्हावे आणि गोदावरी नदी अखंड वाहत रहावी, यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे व त्यांच्या पत्नी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह अनेक संत, महंतांच्या व भाविक-भक्तांच्या उपस्थितीत पवित्र श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या सोमवारी (११ सप्टेंबर) रात्री गोदामातेची ओटी भरून, मशाली प्रज्वलित करून बम बम भोले, हर हर महादेव, हर हर गंगेच्या जयघोषात गंगा गोदावरीची ओटी भरून सामूहिक महाआरती करण्यात आली. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्यात गंगा गोदावरीचे पूजन व महाआरती करण्यात येईल. तसेच गोदावरीच्या तळापर्यंत घाट बांधण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे विवेकभैय्या कोल्हे यांनी यावेळी जाहीर केले.
युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या गंगा गोदावरीच्या महाआरतीसाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पू. रमेशगिरीजी महाराज, प.पू. राघवेश्वरानंदगिरीजी ऊर्फ उंडे महाराज, महामंडलेश्वर श्रीश्री १००८ प. पू. शारदानंदगिरीजी माताजी, प. पू. विकास गिरीजी महाराज, प.पू. गोवर्धनगिरीजी महाराज, प.पू. कैलासानंदगिरीजी महाराज, प. पू. कैलास राजगुरू महाराज, प.पू. गणपतराव लोहाटे महाराज आदी संत, महंतांची प्रमुख उपस्थिती होती. संत, महंतांसह विवेकभैय्या कोल्हे व रेणुकाताई कोल्हे यांनी भगवान शंकराचे व गोदामातेचे पूजन केले. प्रमोद जोशी गुरू व संच यांनी या महाआरतीचे पौराहित्य केले. आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी, बम बम भोले, हर हर महादेव, हर हर गंगेचा जयघोष, आसमंत दुमदुमून टाकणारा शंखनाद व सुंदर भक्तिगीतांच्या सादरीकरणामुळे रंगलेल्या या भव्य दिव्य नेत्रदीपक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी महिलांसह भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महाआरतीला भाविकांचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद मिळाला. ही महाआरती सुरू असताना संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. यावेळी वैभव सोमासे, विजय गुंजाळ, नितीन मरसाळे, राहुल वाकळे, निरंजन खंडागळे, वैभव आगळे, श्रद्धा सोमासे आदींनी सुंदर भक्तिगीते सादर केली. उपस्थित सर्व शिवभक्त भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.
दुष्काळाचे संकट टळण्यासाठी व चांगला पाऊस पडावा म्हणून ७ सप्टेंबरला संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विघ्नेश्वर मंदिरात पर्जन्य महायज्ञ करण्यात आला. गोदामाता सदैव वाहती राहावी, यासठी आज गंगा गोदावरी महाआरती करण्यात आली. पर्जन्य महायज्ञ व गंगा गोदावरी महाआरतीचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून प.पू. रमेशगिरीजी महाराज, प.पू. उंडे महाराज, प. पू. शारदानंदगिरीजी माताजी यांनी विवेकभैय्या कोल्हे यांचे कौतुक केले. पवित्र गोदामातेचे ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या असलेले महत्त्व विशद करून त्यांनी उपस्थित सर्वांना शुभाशीर्वाद दिले.


विवेकभैय्या कोल्हे म्हणाले, गोदावरी नदीकाठी वसलेल्या कोपरगाव शहर व तालुक्याला ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभला आहे. कोपरगाव ही साधू-संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. गोदावरी नदी ही कोपरगाव नगरीला लाभलेले वैभव आहे. गोदामाता ही आपली जीवनदायिनी आहे. गोदामाता सदैव प्रवाही रहावी, धरणे तुडुंब भरावी, कोपरगावसह संपूर्ण महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकरी, व्यापारी व जनतेचे जीवन आनंदी व सुजलाम सुफलाम व्हावे, यासाठी आज आपण गंगा गोदावरीची महाआरती केली. या उपक्रमात अनेक साधू, संत व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला याबद्दल विवेकभैय्या कोल्हे यांनी सर्वांचे आभार मानले. गोदावरी नदीवर माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांनी हिंगणी नदीवर पहिला बंधारा बांधून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणली. आपल्या सर्वांच्या जीवनात गोदावरी नदीचे खूप मोठे महत्त्व असून, गोदामातेचे प्रदूषण टाळण्यासाठी व नदीपात्र स्वच्छ राहावे, यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रारंभी विवेकभैय्या कोल्हे व रेणुकाताई कोल्हे यांनी संत, महंतांचे पूजन व सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक स्वप्नील मंजुळ, आकाश वाजे, स्वराज सूर्यवंशी, समाधान कुऱ्हे, रवींद्र लचुरे, रुपेश सिनगर, नरेंद्र लकारे, अर्जुन मरसाळे, ओम बागुल, समीर खाटिक, दत्तात्रय कोळपकर, इलियास शेख, अनिल जाधव, अजय गायकवाड, सिद्धार्थ पाटणकर, भैय्या नागरे, वैभव सोळसे, अभिजीत सूर्यवंशी, अमोल बागुल, समीर सुपेकर, मोनू म्हस्के, विक्रमादित्य सातभाई,सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, पंकज कूऱ्हे,मयूर लचुरे,आशिष निकुंभ,वासुदेव शिंदे, सतीश निकम, मनोज इंगळे,कुणाल आमले,सागर राऊत,सागर बागुल,सागर ठमके,सचिन वायकर,नवनाथ वायकर,शिवप्रसाद साठे,विकी परदेशी,राहुल माळी,अभिषेक सुर्यवंशी,गोरख वाडीले,मंगेश पवार,अशोक नाईकवाडी आदींसह माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्ष, संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवासेवक,भजनी मंडळ, व्यापारी, शिवभक्त नागरिक व महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

