सौ.बेबी वैराळ यांची सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सत्कार….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्र राज्यातील बहुजन रयत परिषदेच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या मरळगोई गावच्या सरपंच पदी सौ. बेबी नारायण वैराळ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री.रमेश गालफाडे,ॲड. सौ.कोमल साळुंखे ( ढोबळे ) यांच्या हस्ते नाशिक शहरातील बहिणाबाई महिला महाविद्यालयाच्या सभागृहात यथोचित सन्मान करून सत्कार करण्यात आला.
मरळगोई ग्रामपंचायतीत सौ.बेबी वैराळ या उपसरपंच असताना महाराष्ट्र सरपंच परिषदेचा पुरस्कार मिळालेला असून उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर त्यांची गावाच्या विकासाच्या दृष्टीने केलेल्या कामाच्या विकासाची पावती म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. चांदवड येथील साळवे कुटुंबात त्यांचा जन्म झाला असून मरळगोई हे त्यांचे सासर आहे.त्यांच्या निवडीबद्दल नाशिक जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना,संस्था,हितचिंतक,निफाड तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, मरळगोई तालुक्यातील नागरिकांच्या वतीने वतीने सत्कार करण्यात येत आहे तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *