
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव औद्योगिक वसाहतीमधील १४० उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांना अखंडीत वीजपुरवठा ३३ केव्हीए वीज केंद्रातून वीज द्यावी अशी मागणी वसाहतीचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी केली होती ती मान्य करून आता या सर्व उद्योजकांना अखंडीत वीज जोड देण्यात आला असून उद्योजकांचे व्यावसायीक नुकसान टळले गेले त्यामुळे सर्व उद्योजकांनी कोल्हे यांचे विशेष आभार मानले आहे. श्री. विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की, कोपरगांव औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या प्रलंबीत वीज मागण्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस व नाशिक येथील विज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता यांचेशी चर्चा करून वीज समस्यांची सोडवणुक व्हावी म्हणून मागणी केली होती. त्यावर कोपरगांव औद्योगिक वसाहतीसाठी भुमिगत ३३ के..व्ही.ए वीज केंद्राची स्वतंत्र उभारणी करून त्यातून यांचा पुरवठा संवत्सर, कोकमठाण, वारी आणि कान्हेगांव फीडर जोडल्यांने ३३ के.व्ही.के..व्ही.ए वीज केंद्रात वारंवार बीघाड होऊन त्याचा फटका कोपरगांव औद्योगिक वसाहतीमधील सर्व उद्योजकांना बसत होता. त्यातील रासायनीक, सिमेंट, पाईप आदी उत्पादक कारखान्यांचे उत्पादनांत घट होऊन मोठ्या प्रमानात व्यावसायीक आर्थिक नुकसान होत होते. तेंव्हा या सर्व उद्योजकांना १३२ केव्हीए वीज उपकेंद्रातून नवीन स्वतंत्र ३३ के.व्ही.ए. बे लाईन टाकुन वीज पुरवठा झाला नाही तर आपल्यासह सर्व उद्योजकांनी बेमुदत उपोषणाचे वीज वितरण कंपनीस पत्र दिले होते. त्याची दखल वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतली आणि कोपरगाव औद्योगिक वसाहतीमधील सर्व उद्योजकांच्या उत्पादनासाठी स्वतंत्र ३३ के.व्ही.ए बे लाईन टाकुन देऊन अखंडित वीज पुरवठा सुरळीत चालू केला आहे त्यामुळे व्यावसायीकांनी कोपरगाव औद्योगिक वसाहतचे सर्व संचालक, व्यवस्थापन व अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांचे विशेष आभार मानले आहे. आता या सर्व उद्योजकांना अखंडित वीज पुरवठा होणार असल्याने त्यांचे व्यावसायिक नुकसान टळणार आहे.
कोपरगाव औद्योगिक वसाहतीच्या अन्य मूलभूत समस्या तसेच उद्योग व्यवसायासाठी अतिरिक्त जमीन मिळावी, शेती महामंडळाच्या जमिनीत कोपरगाव साठी अद्यावत स्वतंत्र्र एम.आय.डी. सी. होऊन येथील सुशिक्षित बेरोजगारांच्याा हाताला काम मिळावे या संदर्भातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री, व संबंधित अधिकारी यांच्याशी नुकतीच चर्चा झाली असल्याचेही विवेकभैय्या कोल्हे शेवटी म्हणाले.
