
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाचा विकास साधतांना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी मतदार संघात हजारो कोटींच्या विकास कामांचे थर रचले आहेत. यावर्षी सर्व सण उत्सव साजरे करण्यासाठी कोणतेही बंधने नाहीत. त्यामुळे यावर्षी सामाजिक बांधिलकी जोपासत असतांना आपल्या संस्कृतीची जपवणूक करण्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे.या विकासाच्या दहीहंडी उत्सवात गोविदांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून आपल्या गोविंदा पथकांची नाव नोंदणी करावी असे आवाहन दहीहंडी उत्सव कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के यांनी केले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा दहीहंडी उत्सव साजरा करू शकलो नाही. मात्र या जीवघेण्या आजाराची तीव्रता बऱ्याच अंशी कमी झाल्यामुळे सर्व जगजीवन पूर्वपदावर आले असून सर्वत्र गोकुळाष्टमी सण व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे ना. आशुतोष काळे यांनी देखील हा पारंपारिक उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्सवात पहिल्यांदाच युवतींना देखील संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या उत्साही युवतींना या दहीहंडी उत्सवात सहभागी व्हायचे आहे त्या युवतींनी व त्यांच्या पथकाने ना. आशुतोष काळे यांच्या जन संपर्क कार्यालयाशी संपर्क करून आपल्या मंडळाची नाव नोदणी करणे गरजेचे आहे. जेणेकरून पुढील नियोजन करणे सोयीस्कर होणार आहे. या दही हंडी उत्वसात विजयी गोविदांना मोठ्या प्रमाणात रोख स्वरुपात बक्षिसे देण्यात येणार आहेत. गोविंदा पथकांनी लवकरात लवकर आपल्या मंडळाची नाव नोंदणी करून विकासाच्या दहीहंडी उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन चंद्रशेखर म्हस्के यांनी केले आहे.
