

कोपरगाव प्रतिनिधी:-
मनसे अध्यक्ष माननीय
श्री राज साहेब ठाकरे
यांच्या आदेशानुसार
तसेच कोपरगाव चे लाडके मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे यांच्या नेतृत्वाखाली आज कोपरगाव येथील
मृत्युंजय मंदिरांमध्ये मनसेच्या वतीने हनुमान चालीसा पठण करण्यात आले.


तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार व राज साहेब ठाकरे यांच्या वक्तव्याला मुस्लिम समाजाने जो भरभरून प्रतिसाद देऊन आजन भोग्यावर न घेतल्या बद्दल मनसेच्या वतीने मुस्लिम बांधवांचे आभार मानण्यात आले.



तसेच कोपरगाव चे कर्तव्यदक्ष अधिकारी माननीय
श्री वासुदेवजी देसले साहेब यांनी वारंवार
मुस्लिम धर्मगुरूंना तसेच हिंदू बांधवांना एकत्र आणून त्यांना होणार्या परिणामाबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन केले.
व दोन्ही धर्मांनी त्यांच्या शब्दाला मान दिला आणि आज शांतते मध्ये आजान व हनुमान चालीसाचे पठण झाले. वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या वासुदेवजी देसले साहेबांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

या वेळी मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे, उपशहराध्यक्ष
अनिल गाडे, विजय सुपेकर
तालुका संघटक
रघुनाथ मोहिते
हिंदू सम्राट संघटना संस्थापक निलेश ( बापू भाऊ ) काकडे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष रोहित एरंडे विद्यार्थी उपशहराध्यक्ष
संजय जाधव, मनसे युवा नेते नवनाथ मोहिते हिंदू सम्राट संघटना शाखा येवला रोड अध्यक्ष अतिश शिंदे, उपाध्यक्ष अनिकेत खैरे, बल्ली पाटोळे, अजिंक्य काकडे, सुरेश सुपेकर, रजनीकांत श्रीसुंदर , विजय पाटोळे, सतिश कोळि, अनिल सुपेकर, सोनु कोळी , अमोल सुपेकर,उमेश सोनवणे बंटि पवार, आदित्य काळे, यदमळ आदि मनसैनिक उपस्थित होते.
