कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- प्रतिकूल परिस्थितीत शिवाजी महाराजांवर संस्कारमुल्य रुजवून युग प्रवर्तक निर्माण करणाऱ्या राजमाता जिजाऊ आदर्श प्रशासक व प्रखर परिवर्तनवादी आणि रंजल्या गांजल्याच्या पालनकर्त्या होत्या. त्यांचे विचार दुरदृष्ठीचे, क्रांतिकारी आणि परिवर्तनवादी होते. त्यांच्या विचारात अन्यायाप्रति चीड आणि युगप्रवर्तनाचं सामर्थ्य दडलेलं होतं. बुद्धीवादी कर्तबगार असणाऱ्या आदर्श कन्या, आदर्श पत्नी, आदर्श माता, प्रेरणादायी आजी अशा विविध आघाड्यांवरील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणाऱ्या राजमाता जिजाऊ मातृत्वाचा आदर्श असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी केले.
स्वराज्यप्रेरीका राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील जिजामाता उद्यानातील राजमाता जीजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, अजीज शेख, फकीर कुरेशी, राहुल देवळालीकर, चंद्रशेखर म्हस्के, अशोक आव्हाटे, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, आकाश डागा, इम्तियाज अत्तार, राजेंद्र जोशी, ऋषिकेश खैरनार, दिनेश पवार, विकि जोशी, प्रताप गोसावी, सागर लकारे, सोमनाथ आढाव, शुभम लासुरे, रविंद्र राऊत, मनोज नरोडे, प्रसाद रुईकर, जनार्दन शिंदे, संतोष बारसे, गणेश बोऱ्हाडे, संतोष टोरपे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ:- राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतांना आ. आशुतोष काळे व मान्यवर.
