नव्याने प्रस्ताव दाखल केलेल्या इमारत बांधकाम कामगार लाभार्थ्यांना अटल विश्वकर्मा योजनेचे लाभ मिळावे:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगांव शहर व ८९ गावातील विधानसभा मतदारसंघाच्या इमारत बांधकाम व अन्य कामगारांना अटल विश्वकर्मा बांधकाम योजनेचे सर्व लाभ मिळावे यासाठी नव्याने प्रस्ताव दाखल केले असुन त्यांना अद्यापही त्याचे फायदे सुरू झालेले नाहीत अशा सर्व कामगारांनी आपल्याकडे मागणी केली आहे तेंव्हा कोपरगांव विधानसभा मतदार संघातील बांधकाम कामगारांसह अन्य कामगारांना तात्काळ या योजनेचे लाभ सुरू करावेत अशा आशयाचे पत्र भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सहायक कामगार आयुक्त अहमदनगर व अन्य अधिका-यांना मागणी केली आहे.
सौ. कोल्हे यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षापासुन कोरोना महामारीमुळे सर्वाचीच आर्थीक परिस्थिती खालावलेली आहे. हातावर प्रपंच असणारे व मोलमजुरी करून चरितार्थ चालविणारा बांधकाम कामगारासह अन्य मजुर वर्ग येथे मोठया प्रमाणात आहे. त्यापैकी बहुतांष कामगारांना त्याचे फायदे आपण यापुर्वीच मिळवुन दिले आहे. अजुनही कोपरगांव विधानसभा मतदार संघातील इमारत बांधकाम व अन्य कामगारांना अटल विश्वकर्मा बांधकाम योजनेचे लाभ मिळावे म्हणून आवश्यक त्यासर्व कागदपत्रासह प्रस्ताव अहमदनगर येथे दाखल करण्यांत आलेले आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहे. कोरोना लॉकडाउनची परिस्थिती आता सुरू होत आहे पण अद्यापही या इमारत बांधकाम सह अन्य कामगारांना रोजीरोटीसाठी वणवण इतरत्र भटकुनही काम मिळत नाही, परिणामी त्यांची उपासमार होत आहे, तेंव्हा या सर्व लाभार्थ्यांना अटल विश्वकर्मा योजनेचे लाभ तात्काळ द्यावे असेही सौ. कोल्हे यांनी शेवटी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *