मा.आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांचे कार्य राज्याला आदर्शवत व स्मरणीय:- कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-राज्यातील आदिवासी बांधवांच्या उत्कर्षात सातत्यांने नवनविन स्थित्यंतरे घडवुन आणणारे व्यक्तीमत्व म्हणजे माजीमंत्री कै. मधुकरराव पिचड होय, त्यांचे कार्य राज्याला आदर्शवत होते अशा शब्दात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी श्रध्दांजली वाहिली. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव करून श्रध्दांजली वाहिली.श्री. […]

Read More

भारतीय बौद्ध महासभेच्या शहराध्यक्षपदी राजेंद्र घोडेगाव…

(घोडेगाव )कोपरगाव प्रतिनिधी :- बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी स्थापन केलेल्या दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेची स्थापना करून या संस्थेद्वारे बौद्धांचे न्याय अधिकार यांचा लढा सुरू केलेला आहे. आज पर्यंत या संस्थेने अनेक समाजशील उपक्रम राबवून समाजामध्ये वेगळं स्थान निर्माण केले आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या […]

Read More

माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली…

सुसंस्कृत, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व हरपले:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर अकोले तालुक्यात राजूर येथील मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कै.पिचड यांच्या पार्थिवाचे राजूर येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी कै.पिचड यांच्या कुटुंबीयांशी […]

Read More

भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा के.बी.रोहमारे कनिष्ठ व के.जे.सोमैय्या वरिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथे संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-“स्वातंत्र्योत्तर काळात अर्थात 1960 च्या दशकातलं महाराष्ट्राचं वातावरण हे वेगळं होतं. शेतकरी-शेतमजुरांची पिढी शिकली पाहिजे, ही जाणीव त्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील, मामासाहेब जगदाळे व गाडगेबाबांची होती त्याच पंक्तीत अ.नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मुलं शिकली तरच महाराष्ट्र पुढे जाईल. अशा धारणांच्या आधारे आजचे शिक्षक, प्राध्यापक, वकील व इंजिनिअर यांची पिढी घडवणाऱ्या के. बी. साहेबांच्या नंतर […]

Read More

गौतम पब्लिक स्कूल मध्ये इंटर हाऊस स्पर्धा सुरू…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल मध्ये दिनांक ७ डिसेंबर २०२४ पासून संस्थेच्या सचिव सौ..चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंटरहाऊसेस स्पर्धा सुरू झाल्या असल्याची माहितीशाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.गौतम पब्लिक स्कूल मधून उद्याचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत या उदात्त हेतूने संस्था विश्वस्त आमदार आशुतोष काळे, […]

Read More

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली…

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं:- उपमुख्यमंत्री अजित पवार…कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):- ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेबांच्या निधनानं, आदिवासी बांधवांच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत, महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, माजी मंत्री […]

Read More

मधुकरराव पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक गमावला:- देवेंद्र फडणवीस…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):-भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात की, मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले. विरोधी पक्षनेते, मंत्री […]

Read More

बांगलादेशाची पुन्हा फाळणी करा, राजेंद्र झावरे यांची पंतप्राधान व गृहमंत्र्यांकडे मागणी.हिंदुवरील अत्याचार रोखत, स्वतंत्र हिंदूंसाठी बांगलादेश निर्माण करा…

कोपरगाव प्रतिनिधी:- तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेश निर्माण केला. ते उपकार बांगलादेशवासी विसरले आहे. तेथील हिंदूंवर अमानुष अत्याचार सुरू आहेत. आता पुन्हा एकदा धाडसी निर्णय घेऊन बांगलादेशची फाळणी करून दोन तुकडे करावेत अशी मागणी उद्धवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख व माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री अमित शहा […]

Read More

डॉ. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा विचार पुढे नेण्याचा, जातीमुक्त समाजनिर्मितीचा निर्धार करुया :- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता, समता, बंधुतेचा विचार दिला. अस्पृश्यता निवारण, जातीमुक्त समाजनिर्मितीत डॉ. बाबासाहेबांनी सर्वाधिक योगदान दिले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, अशा […]

Read More

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात राष्ट्रीय वुशु स्पर्धेच्या प्रशिक्षण शिबिराची सुरुवात…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवा सेवा संचालनालय सेवा संचालनालय आणि एस. एस. जी. एम. कॉलेज, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे दिनांक 8 ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय वुशु क्रीडा स्पर्धेच्या प्रशिक्षण शिबिराची सुरुवात दिनांक 3 डिसेंबर पासून 7 डिसेंबर 2024 या कालावधीत झाली असून सदर क्रीडा स्पर्धेच्या प्रशिक्षण प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य […]

Read More