निळवंडेच्या चाऱ्यांच्या प्रश्नाबाबत आ. आशुतोष काळेंची विधानसभेत लक्षवेधी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – निळवंडेच्या डाव्या कालव्यावर ठाण मांडून बसून डाव्या कालव्याचे पाणी कोपरगाव मतदार संघातील मागील अनेक दशकापासून कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या भागात आणणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी आता हे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत लवकरात लवकर कसे पोहोचेल यासाठी निळवंडेच्या चाऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न थेट विधानसभेत उपस्थित करून विधानसभेचे लक्ष वेधले आहे.हिवाळी अधिवेशनात आ. आशुतोष काळे यांनी […]

Read More

संजीवनी अभियांत्रिकीच्या महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांची रू ३० लाख स्कॉलरशिपसह इंटर्नशिपसाठी कॅनडात निवड:- श्री अमित कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या पाच विध्यार्थ्यांची रिसर्च इंटर्नशिपसाठी (संशोधनात्मक आंतरवासिता) कॅनडाच्या नामांकित विद्यापीठांमध्ये प्रत्येकी रू ६ लाख असे रू ३० लाख स्कॉलरशिपसह निवड झाली असुन या निवडीमुळे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपले स्थान आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन मिटॅक्स, कॅनडा आणि […]

Read More

श्री खंडेराया महाराजांच्या अलौकिक शक्तींचा आशीर्वाद हीच आपली ऊर्जा:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- चंपाषष्ठीच्या शुभ मुहूर्तावर माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथील श्री खंडोबा देवस्थानला भेट देऊन श्री खंडोबारायाचे मनोभावे दर्शन घेतले. सर्व भाविकांना त्यांनी चंपाषष्ठीच्या शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ दे, सर्व संकटे व दु:ख दूर होऊन आनंद येऊ दे, सर्वांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होऊ दे, कोपरगाव मतदारसंघासह राज्यातील बळीराजा सुखी होऊ […]

Read More

रस्ते सुरक्षा अभियानात चालकांनी स्वत:बरोबरच समाजाची काळजी घ्यावी:- पी.जी.पाटील…

कोपरगांव प्रतिनिधी:-उस वाहतुकीचा हंगाम सध्या जोरात सुरू आहे शेतातील उस वाहनातुन कारखानास्थळावर आणतांना चालकांनी स्वत:बरोबरच समाजाची काळजी घेत रस्ते वाहतुकीचे सर्व नियम पाळावे, अपघात टाळण्यासाठी नेहमी सतर्क रहावे, ज्या चालकांनी अजुनही वाहन परवाने काढले नाही त्यांनी ते तात्काळ काढुन घ्यावे असे आवाहन श्रीरामपुर विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. जी. पाटील यांनी केले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी […]

Read More

सरकार कोणतेही असो, गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय आ.आशुतोष काळेंची विधानसभेत लक्षवेधीसमन्यायी पाणी वाटप कायद्यामध्ये बदल करून शेतकऱ्यांवर सातत्याने होणारा अन्याय दूर करा:- आ.आशुतोष काळे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- चालू वर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात दुष्काळी परिस्थिती असतांनाही परत एकदा समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या आधारे नगर-नासिकच्या धरणातून खाली पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा शासनाकडून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून शासन कोणतेही असो गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्यायच होत आला आहे याकडे आ. आशुतोष काळे […]

Read More

व्यवसाय करताना सकारात्मक व हसतमुख रहा:- संजय मालपाणी, सुप्रसिद्ध उद्योजक…

कोपरगाव प्रतिनिधी:- लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय, उद्योग करताना सकारात्मक व हसतमुख राहिले पाहिजे. व्यवसाय वृद्धी तुमच्या मागे आपोआप येईल. केवळ लक्ष्मीची पूजा करू नका, तर नारायणाची देखील पूजा करा. कारण लक्ष्मी गिधाडावर बसून येते, तर नारायण गरुडावर स्वार होऊन येतो. मॉलमध्ये येणारा कस्टमर असतो. तुमच्या दुकानात येणारा ग्राहक असतो, त्यामुळे ‘ग्राहक देवो भव’ या […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी साईनाथ तिपायले तर उपाध्यक्षपदी केशव बटवाल यांची बिनविरोध निवड…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील शिंगणापुर येथील संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरणेतुन व बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील तसेच जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी साईनाथ पंढरीनाथ तिपायले तर उपाध्यक्षपदी केशव गोविंद बटवाल यांची नुकतीच बिनविरोध निवड […]

Read More

पुर्व भागातील बंधारे पालखेडच्या पाण्यांने भरून द्यावे:- स्नेहलता कोल्हे….

कोपरगांव प्रतिनिधी:-दुष्काळसदृष्य परिस्थितीमुळे तालुक्याच्या पुर्व भागातील बंधारे व पाझर तलाव पालखेडच्या पाण्याने भरून द्यावे अशी मागणी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी कार्यकारी अभियंता पालखेड पाटबंधारे विभाग नाशिक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनांत पुढे म्हटले आहे की, चालु पावसाळी हंगामात खरीप व रब्बी हंगामात पाउस झाला नाही त्यामुळे पुर्व भागातील कोळ नदीवरील […]

Read More

समृद्ध कोपरगाव’साठी एकजुटीने काम करू:- विवेकभैय्या कोल्हे,,व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व ग्राहक सन्मान योजनेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात….

कोपरगाव प्रतिनिधी:- सध्याच्या स्पर्धेच्या युगात दैनंदिन जीवनात व उद्योग-व्यवसायात यशस्वी होण्यासाठी व्यापाऱ्यांनी काळानुरूप स्वत:मध्ये बदल घडवून व्यक्तिमत्त्व विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. राजकारणात जर निकोप स्पर्धा झाली तर कोपरगावच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळेल. कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट्स असोसिएशनने सुरू केलेला ‘आपली खरेदी आपल्या गावात’ हा उपक्रम कौतुकास्पद असून, या उपक्रमामुळे कोपरगावच्या […]

Read More

व्यापारी बांधवांनो तुमच्या सहकार्यातून विकसित कोपरगाव निर्माण करू:- आ.आशुतोष काळे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहराच्या विकासाला पूर्व पदावर आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून कोपरगाव शहराच्या विकासाबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. शहर विकासासाठी छोट्या-मोठ्या व्यापारी बांधवांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्यामुळे शहर विकासाला चालना देण्यात मोठी मदत झाली असून यापुढील काळात व्यापारी बांधवाच्या सहकार्यातून कोपरगावकरांना अपेक्षित असलेला अधिकचा विकास करून […]

Read More