ज्योती सहकारी पतसंस्थेचा ३१ मार्च २०२५ अखेर ५९५ कोटींचा एकत्रीत व्यवसायअॅड.रविकाका बोरावके…

कोपरगाव प्रतिनिधी:-नुकत्याच झालेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात ज्योती सहकारी पतसंस्थेला ३ कोटी ३५ लाख नफा झाला आहे. यामध्ये ३६०कोटी रूपयांच्या ठेवी तर २३५कोटी रूपयांची कर्ज वितरीत केली आहे. संस्थेची गुंतवणूक १४८कोटी रूपयांची इतकी झाली आहे. संस्थेचा एकत्रित व्यवसाय ५९५कोटी इतका झाला आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन अॅड. रविकाका बोरावके यांनी दिली.सभासद व ठेवीदारांनी उत्तम प्रतिसाद […]

Read More

जागतिक जल दिनानिमित्त प्रत्येकाने जल संवर्धनाची कास धरावी:- संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के…

कोपरगाव प्रतिनिधी:-(राहुरी विद्यापीठ):-सिंचनाचे पाणी हे कोरडवाहू विभागात तारक व बागायत क्षेत्रात अतिरिक्त वापराणे मारक होऊ शकते त्यासाठी पाण्याचे काटकसरीने नवीन आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर केल्यास जामिनी क्षारपड होणार नाही व विविध पिकांचे शाश्वत उत्पादन घेता येईल. जागतिक जल दिनानिमित्ताने प्रत्येकाने जल संवर्धनाची कास धरावी असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के […]

Read More

बालरोग तज्ञ डाॅ.अमोल अजमेरे यांची कोपरगांव इंडियन मेडिकल असो.च्या अध्यक्षपदी निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान विदयालयांचे स्कुल कमिटी सदस्य बालरोग तज्ञ डॉ. अमोल जयकुमार अजमेरे यांचीनुकतीच कोपरगांव च्याआय.एम.ए च्या अध्यक्षपदीनिवड जाहिर झाली आहे.बालरोग तज्ञ डाॅ.अमोल अजमेरे यांनी २००५ मध्ये कोपरगांव शहरात प्रॅक्टिस सुरु केली.ऊस तोड कामगार यांचे आरोग्यविषयक समस्या सोडण्यास ते विशेष प्रयत्न शिल असतात.ग्रामीण रुग्णालयात देखिल ते सेवा देण्यात अग्रेसर असतात.काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोपरगांव शहरात सर्व सोयीयुक्त […]

Read More

एकवेळ भूक मिटेल पण लागलेली तहान भागवा, पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवा:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगांव उपबाजार आवार मोर्विस (धामोरी फाटा) कोपरगांव येथील जागेचा भूमिपुजन सोहळा रविवार मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. बाजार समितीला सर्वोतोपरी सहकार्य आपले आहे आणि पुढेही कायम असेल कारण सहकारी तत्वावर चालणारी ही संस्था भरभराटीला आली पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळेल […]

Read More

जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या गंगुबाई जाधव…

कोपरगाव प्रतिनिधी:-जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कोल्हे गटाच्या गंगुबाई बाळासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली आहे. जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीचे उपसरपंच वैशाली संदेश भोंगळे यांनी रोटेशन पद्धतीनुसार पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच सौ. सुवर्णा पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा.आ.स्नेहलताताई कोल्हे आणि युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या सहा अभियंत्यांची बर्नस अँड मॅकडॉनेल कंपनीने केली वार्षिक पॅकेज रू ५. २५ लाखांवर नोकरीसाठी निवड…

ग्रामिण विद्यार्थी बनताहेत लाखोच्या पॅकेजचे मानकरी…कोपरगांव प्रतिनिधी: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचा मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नाने बर्नस अँड मॅकडॉनेल इंडिया या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत सहा अभियंत्यांची वार्षिक पॅकेज रू ५. २५ लाखांवर नोकरीसाठी निवड केली आहे. अशा प्रकारे एका मागे एक कंपनी संजीवनीच्या अभियंत्यांची नोकरीसाठी […]

Read More

श्री गणेश कारखान्याच्या कर्जाला मंजुरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार ;श्री गणेशचे कर्ज मंजूर, कोल्हेंसह संचालक मंडळाने मानले ना.फडणवीस यांचे आभार….

कोपरगाव प्रतिनिधी:- श्री गणेश सहकारी साखर कारखान्यासाठी एन.सी.डी.सी. अंतर्गत मार्जिन मनी लोन ७४ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वात श्री गणेश कारखाना संचालक मंडळाने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेऊन आभार व्यक्त केले.या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी […]

Read More

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये गौतम बँकेला १.१७ कोटीचा निव्वळ नफा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे आधारस्तंभ मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली गौतम सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये नेत्रदीपक कामगिरी करतांना विक्रमी ०१ कोटी १७ लाख रुपये निव्वळ नफा मिळविला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष संजय आगवन, मुख्य […]

Read More

श्रीरामकथेसाठी आत्मिक श्रध्दा असावी त्याशिवाय गोडी नाही:-साध्वी सोनालीदिदी कर्पे…

कोपरगांवप्रतिनिधी:-मानवी जीवनाचा प्रवास खडतर आहे, पण परमेश्वरी सेवेतुन त्यातील अडचणींवर उपाय सापडतो, पती-पत्नी हे विश्वासाचं नातं आहे, प्रत्येकाला वाटतं देवाने आपल्या घरी यावं पण त्यासाठी श्रध्देची प्रतिक्षा महत्वाची असते, कोपरगांव शहर आणि तालुका हा अनेक संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असुन गोदावरी नदी काठी श्रीरामकथा होत आहे हे तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे, या कथेसाठी […]

Read More

जीवघेण्या स्पर्धेमुळे ग्रामिण अर्थकारणाची कामधेनु साखर उद्योग अडचणींत शासनांने वेळीच उपाययोजना कराव्यात:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-साखर उद्योग ही ग्रामिण अर्थकारणाची कामधेनु असुन अलिकडच्या काळात त्यात जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे त्यावर शासनांने वेळीच उपाययोजना केली नाही तर साखर उद्योग व त्यावर अवलंबुन असणारे अर्थचक्र आगामी दहा वर्षात पुर्णपणे उध्वस्त होईल अशी भिती संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी व्यक्त केली. शेतक-यांनी बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून एकरी […]

Read More