Uncategorized

ज्यांच्या वस्तीवर जाण्यासाठी तुम्हाला रस्ता करता आला नाही, तुम्ही त्यांच्या आडून विकासावर बोलता? :- मा.सरपंच शशिकांत वाबळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- सुरेगाव गावठाण येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी दहा वर्षापुर्वी सुरेगाव ग्रामपंचायतीने तुम्हाला ना हरकत दाखला दिला. तुम्ही सांगता त्याप्रमाणे सभागृह मंजूर झाले असेल असे मान्य केले तरी त्या घटनेला आज दहा वर्षे होवूनही त्या ठिकाणी केवळ भिंतीच उभ्या आहेत. त्यामुळे हे सभागृह खरोखर मंजूर झाले होते का? असा प्रश्न सुरेगावच्या नागरीकांना पडला असून ज्यांना दहा वर्षांच्या कालावधीत सभागृह पूर्ण करता आले नाही? जे तुमचे वर्षानुवर्षांपासून कारखान्याचे संचालक आहेत, त्यांच्या वस्तीवर जाण्यासाठी तुम्हाला रस्ता करता आला नाही. तुम्ही त्यांच्या आडून विकासावर बोलणे अतिशय हास्यास्पद असल्याची टीका सुरेगावचे माजी लोकनियुक्त सरपंच शशिकांत वाबळे यांनी कोल्हेंवर केली आहे.
सरपंच शशिकांत वाबळे यांनी पुढे म्हटले आहे की,आमदार आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या विकासासाठी दिलेल्या हजारो कोटीच्या निधीतून अनेक विकासाची कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत तर काही कामांना सुरुवात होत आहेत. ज्या कामांना सुरुवात होत आहे. यामध्ये मंजूर असलेल्या १० कोटी निधीतून दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या कोळपेवाडी-सुरेगाव सिमेंट काँक्रिटीच्या रस्त्याचा पण समावेश असून या रस्त्याचे काम सुरु झाले आहे.सदरच्या रस्त्याचे होणारे काम दर्जेदार व नियोजित अंदाजपत्रकानुसार व्हावे यासाठी सबंधित रस्त्याची संपूर्ण माहिती यामध्ये रस्त्याचा नमुना, काटछेद, कामाचा तपशील आणि काँक्रिटीकरणाच्या थरांची माहिती दर्शविणारे फलक नियमानुसार लावण्यात आले आहेत.

मात्र काम सुरु होणार असल्याची कुणकुण कोल्हेंना कुठून तरी लागल्यामुळे नेहमीप्रमाणे फुकटचे श्रेय मिळते का? याची चाचपणी कोल्हेंनी केली असली तरी नागरीकांमध्ये सोयीस्करपणे गैरसमज पसरविण्याची कोल्हेंची हि जुनीच सवय आहे. मात्र त्यांनी ज्यांच्या नावे प्रसिद्धी पत्रक काढले त्या संचालकाच्या वस्तीवर जाणारा रस्ता सुद्धा त्यांना करता आला नाही हे त्यांचे अपयश आहे. त्यामुळे आरोप करीत असतांना अगोदर आपल्या कार्यकाळात आपण केलेली कामगिरी तपासून पहावी आणि आपण ज्यांच्यावर आरोप करतो ते आरोप करण्याचा आपल्याला नैतिक अधिकार आहे का? हा प्रश्न स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे. उगाच खोटे आरोप करून स्वत:चे हसे करून घेवू नका. तुमच्या प्रत्येक टीकेला आमच्याकडून सडेतोड उत्तर मिळेल. त्यामुळे टीका करतांना राजकीय सल्लागार तपासा असा उपरोधिक सल्ला सरपंच शशिकांत वाबळे यांनी कोल्हेंना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *