स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंती कोपरगांवात साजरी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
हिंदू महासभेचे अध्यक्ष,थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचारमंच, महाराष्ट्र प्रांत ,धर्मयोध्दा माजी खासदार स्व. भिमराव (नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठाण, महाराष्ट्र प्रांत आणि मुंजोबा गणेश मंदिर, यांचे सहभागातून स्वातंत्र्यवीर व्यापारी संघटना यांचे वतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर चौक कोपरगांव येथे साजरी करण्यात आली.
याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री दिपक शिनगर,स्वातंत्र्यवीर व्यापारी संघटनेचे एकनाथ हिवाळे,निलेश साबळे,राजेंद्र कुदळे,अनिल काले,राजकुमार हलवाई,सचिन साबळे, अमोल हलवाई,नरेंद्र डंबीर,योगेश वाणी, राजेंद्र कुदळे, बाबासाहेब जंगम,सुनील गोखले,सुरेश जोरे, रविंद्र जोशी,दिलीप अरगडे,रितेश कुदळे, नितीन काले,मुकुल आहेर, गोविंदराम चावला,गणेश वाणी,अनिल पारख, दिपक कानकुब्जी, इब्राहिम बागवान, रमेश पवार, शेखर ठोंबरे, सुरेश भोईर, दिपक शिंदे,भाऊसाहेब गुढगे, सोमनाथ व्यवहारे, रमेश गोसावी, किशोर मांडगे, यांचे सह राष्ट्रप्रेमी नागरिक, छोटे व्यापारी उपस्थित होते.सुत्रसंचालन सुशांत घोडके यांनी केले. प्रारंभी प्रतिमापुजन करून लाडू वाटप करण्यात आले. या प्रसंगी “स्वातंत्र्यवीर अमर रहे, भारत मात की जय, वंदेमातरम्” जयघोष करण्यात आला.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचार मंच महाराष्ट्र प्रांतचे वतीने सुमारे ११०० नागरिकांना समर्पणसेवेतून स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट दाखविण्यात आला आहे.
स्वातंत्र्यवीर व्यापारी संघटनेच्या माध्यमातून श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा, प्रजासत्ताक दिन, शिवजयंती, श्री रामनवमी सारखे उत्सव आयोजित केले आहे.
स्वातंत्र्यवीर वि. दा. तथा तात्याराव सावरकर म्हणजे स्वातंत्र्य चळवळीतील इतिहासाचे “सुवर्णपान”. सन १८८३ ते १९६६ हा सावरकर यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्य चळवळ, अस्पृश्यता निवारण, प्रखर राष्ट्रभक्ती या सह त्यांचा विज्ञानवादी दृष्टीकोन राष्ट्र विचार धारेला एक उंचीवर नेतो.
स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडात स्वातंत्र्यवीर सावरकर कोपरगांव येथे आले होते. कोपरगांव शहरातील जुने गांवठाण भागातील शनी मंदिर समोरील मैदानावर त्यांची स्वातंत्र्य जनजागृती सभा झाली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोपरगांव येथील प्रथम संघ चालक स्व. गंगाधरजी तथा अण्णा बागुल यांचे “पथसंचलन” या पुस्तकात पृष्ठ १३ वर ते लिहितात, “ख्रिस्ताब्द १९३८ फेब्रुवारी महिण्याचा दिनांक २७ रविवार. कोपरगांवचा ईतिहास लिहिला गेला तर त्यात नमूद करण्याचा तो सुवर्णदिन. कचदेवाच्या त्यागाने अजरामर झालेल्या, श्रीप्रभू श्रीरामचंद्रच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या त्या गोदावरी तटी आज स्वातंत्र्यवीर तात्यारावांची (सावरकर) ती मंगल भेट. अविस्मरणीय योग. श्री शनीमंदिराच्या पटांगणावर, (सध्या जिथे जिजामाता बालोद्यान आहे.) तेथे स्वातंत्र्यवीरांचे भव्य स्वागत. मला वाटतं, कोपरगांवातील ही पहिलीच विराट सभा. कोपरगांवातील तरुणांच्या वतीने त्यांचे पुष्पहाराने स्वागत करण्याचे भाग्य मला लाभले.” ईति. अण्णा बागुल… स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विराट सभेनंतर कोपरगांव पंचक्रोशीतील वातावरण बदलून गेले…आजही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मरण कोपरगांवकर ठेवतात…स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नावाने शहरात सावरकर चौक आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर उद्यान आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर काॅलनी आहे… स्वातंत्र्यवीर व्यापारी संघटना आहे.

वेदमंत्राहून आम्हां वंद्य ’वंदे मातरम्‌’
वंद्य वंदे मातरम्‌ ।।
असे कृतीतून दर्शविणारे सावरकर…

सागरा प्राण तळमळला…
असे स्वातंत्र्यासाठी तळमळीने म्हणत अंदमानच्या काळ कोठडीत यातना सोसणारे सावरकर
देहाकडून देवाकडे जातांना देश लागतो.त्या देशाचे आपण देणे लागतो.
असे विचार मांडत राष्ट्रभक्ती तेवत ठेवणारे सावरकर…
मराठी भाषेत अनेक शब्दांची देणारे सावरकर…महाराष्ट्र राज्याचा कारभार पहाणारे मुंबई स्थीत कार्यालयाला “मंत्रालय” हा मराठी शब्दप्रयोग देणारे सावरकर सदैव देशभक्तांना प्रेरणादायी आणि स्फुर्तीदायी आहे…
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवनावर आधारित अनेक ग्रंथ, पुस्तके, लेख वाचले असतील…स्वातंत्र्यवीराचे दैदिप्यमान कार्य अवघ्या काही तासात मांडणे तसे कठिणच परंतु लेखक, निर्माते, दिग्दर्शक, अभिनेता यांनी हे शिवधनुष्य लिलया पेलले आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर यांना विनम्र अभिवादन आपणास जयंती निमित्ताने शुभेच्छा
वंदे मातरम् ! जय हिंद !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *